Friday, 27 March 2015


सिंचन व्यवस्थापन 



९०% महाराष्ट्र कायमस्वरुपी पाणी टंचाईच्या छायेत
नामवंत जलतज्ञ डॉ.फाल्कन मार्क (स्वित्झर्लंड) यांच्या मापदंडानुसार, दरडोई दरवर्षी १,७०० घ.मी. पेक्षा जास्त प्रमाणात पाणी उपलब्ध असणारा प्रदेश वैभवशाली समजला जातो. या मापदंडानुसार एखाद्या प्रदेशाला सुजलाम-सुफलाम बनवायचे असेल, तर दरडोई दरवर्षी १,००० ते १,७०० घनमीटर पाणी उपलब्ध असावे लागते. सदर पाणी उपलब्धता १,००० घनमीटर पेक्षा कमी प्रमाणांत असलेल्या प्रदेशाला पाणी टंचाईचा प्रदेश म्हणून ओळखले जाते. दरडोई दरवर्षीची पाण्याची उपलब्धता ५०० घ.मी. एवढ्या प्रमाणात खालवल्यास सदर प्रदेश मानवी जीवनासाठी कठीण समजला जातो. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचा विचार करता राज्यातील वेगवेगळ्या भागात पाण्याचा प्रश्न गंभीर स्वरुप धारण करत असल्याचे चित्र दिसत आहे.
२००१ च्या जनगणेनुसार कोकण विभागाच्या २.४९ कोटी लोकसंख्येला ६९,२१० दलघमी म्हणजेच दरडोई दरवर्षी सुमारे २,७८० घनमीटरच्या आसपास पाणी उपलब्ध होते. या उलट गोदावरी, तापी, नर्मदा व कृष्णा या चार नदी खोर्‍यातील, वापरण्यासाठी मुभा असलेल्या ५६,२७६ दलघमी जलस्त्रोतांवर ७.२० कोटी लोकसंख्या अवलंबुन होती. म्हणजे या चार नधी खोर्‍यांच्या क्षेत्रात दरडोई दरवर्षी केवळ ७८८ घनमीटर एवढेच पाणी वापरासाठी उपलब्ध आहे.
सिंचन प्रकल्पांची कार्यक्षमता
कालव्यांची अर्धवट कामे, ऊसासारख्या पिकासाठी मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे सिंचनाचे पाणी, वाढते औद्योगिकीकरण व नागरीकीकरण, सिंचन व्यवस्थेतून होणार्‍या पाण्याची गळती व चोरी, धरणांतील गाळसाठ्यामुळे कमी होत जाणारी सिंचन क्षमता, रात्रीच्या वेळी कालव्यातून वाहणार्‍या पाण्याचा होणारा अपव्यय, तसेच सिंचनाचे पाणी इतर क्षेत्राकडे वळविण्याचे वाढलेले प्रमाण इ. कारणांमुळे निर्माण करण्यात आलेल्या सिंचन क्षमतेचा अपेक्षित प्रमाणांत वापर होताना दिसत नाही. सदर परिस्थितीत बदल घडविण्यासाठी प्रत्येक सिंचन प्रकल्पाच्या आधारे निर्माण झालेली सिंचन क्षमता व वापरात येणारी सिंचन क्षमता याबाबतची प्रकल्पनिहाय अद्ययावत माहिती ठेवण्यात यावी. या पुढील काळात पाण्याची उपलब्धता तसेच जमिनीच्या स्वरुपावरुन पीक पध्दती निश्चित करण्याचे बंधन लाभक्षेत्रातील लहानमोठ्या शेतकर्‍यांवर घालावे लागणार आहे.


धरणांच्या पाणी साठ्यात वाढ -
राज्यात पावसाळ्यातील चार महिने भरपूर पाऊस पडतो. मात्र पावसाचे अडविण्याच्या पुरेशा सुविधा निर्माण न केल्याने पावसाचे बहुतेक पाणी वाहून जाते. यामुळे पावसाळ्यातील चार महिने सोडल्यास राज्यातील बहुतेक नद्या कोरड्या असतात. महाराष्ट्रात भारतातील सर्वात जास्त धरणे असली तरी, धरणातील उपयुक्त पाणीसाठ्याचे प्रमाण तुलनेने फार कमी आहे. राज्यात एखाद्या वर्षी चांगला पाऊस झाला की उर्वरित दोन तीन वर्षे पाणी टंचाईची असतात. चांगला पाऊस झालेल्या वर्षी धरणातील पाणी खाली सोडून द्यावे लागते यामुळे धरणाच्या खालच्या भागांत पुराची स्थिती निर्माण होते. सदर बाब टाळण्यासाठी राज्यातील धरणांची पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी कालबध्द कार्यक्रम हाती घेण्याची गरज आहे. यामुळे चांगला पाऊस असलेल्या वर्षी वाहुन जाणारे पाणी अडवून ठेवणे व टंचाईच्या वर्षात त्या पाण्याचा वापर करणे शक्य होऊ शकेल.
विपुल पाणी असलेल्या खोर्‍यातील पाणी
चितळे आयोगाच्या अहवालानुसार राज्यातील लागवडीयोग्य क्षेत्रापैकी १३% क्षेत्र पाण्याच्या द्रुष्टीने अतितुटीचे, ३२% क्षेत्र तुटीचे, ३४% क्षेत्र सर्वसाधारण पाणी उपलब्धतेचे, ६% क्षेत्र विपुल पाणी असलेले तर १५% क्षेत्र अतिविपुल पाण्याचे आहे. अतितुटीच्या खोर्‍यात जास्तीचे पाणी असलेल्या खोर्‍यातील पाण्याचे वहन करण्याच्या योजना राबविण्याची गरज आहे. जास्त पाणी असलेली नदीउपखोरी, पाणी टंचाई असलेल्या नदी उपखोर्‍यांच्या तुलनेने कमी उंचीवर असल्याने पाणी वहनासाठी मोठ्या प्रमाणांत वीजेची गरज लागणार आहे. यामुळे ही योजना खर्चिक होण्याची शक्यता आहे. मात्र अन्य कोणताही उपाय उपलब्ध नसल्याने या पर्यायाचा सविस्तर अभ्यास हाती घेऊन विविध खोर्‍यात पाणी वहन करण्याचे काम हाती घ्यावे लागणार आहे.
संयुक्त प्रकल्प -
गुजरात, गोवा, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, राजस्थान व कर्नाटक या राज्यांसोबत महाराष्ट्राचे ४५ आंतरराज्यीय संयुक्त प्रकल्प प्रस्तावित आहेत. या आंतरराज्य प्रकल्पांसाठी महाराष्ट्रातील सुमारे १.८२ लाख हेक्टर क्षेत्र बुडणार आहे. सदर आंतरराज्य प्रकल्पांचे काम पूर्ण झाल्यानंतर राज्यातील सुमारे ५.४० लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. तर १२५० मेगावॅट वीज महाराष्ट्राच्या वाट्याला येणार आहे. या आंतरराज्य प्रकल्पांपैकी केवळ १३ प्रकल्पांचे काम आतापर्यंत पूर्ण झाले आहे. मात्र उर्वरित प्रकल्पांची कामे पूर्ण करण्यासाठी इतर राज्ये अपेक्षित प्रतिसाद देताना दिसत नाहीत. या आंतरराज्यीय प्रकल्पाच्या आधारे महाराष्ट्राला फायदा होणार असल्याने इतर राज्यांची वाट न पाहता हे सर्व प्रकल्प प्राधान्यक्रमाने हाती घ्यावेत असे वाटते. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर संबंधित राज्यांकडून खर्चाचा वाटा वसूल करावा अन्यथा त्यांच्या वाट्याचे पाणी खालच्या भागांत सोडू नये. आज या प्रकल्पाची कामे रखडल्याने राज्याच्या वाट्याचे पाणी दरवर्षी खालच्या राज्यात वाहून जाते आहे. याचा परिणाम राज्याच्या सिंचन

Friday, 20 March 2015

महाराष्ट्रतील पाणी  प्रशन
 
महाराष्ट्रातील  पाणी नियोजन 
महाराष्ट्रात पाऊस बेभरवशाचा झाला आहे. तो वेळेवर सुरू न झाल्याने जून महिन्यामध्ये पाण्याची टंचाई भासते; तर ब-याचदा तो लवकर माघारी परतल्याने तलावातील पाणी पावसाळी हंगामातच कमी होते. यावर प्रभावी उपाय म्हणजे तलावांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जलसंवर्धनाची कामे प्राधान्याने हाती घेणे. . अनेक ठिकाणी पाण्याचे सोत दूषित होत आहेत. पाण्याचे प्रदूषण फक्त कारखाने व शहरांच्या सांडपाण्यातूनच होते असे नाही. दरवषीर् हजारो टन निर्माल्य समुदात, तलावांत, नद्यांतून टाकले जाते. नाशिक, पंढरपूर, वाराणसी अशा ठिकाणी धामिर्क कृत्ये नदीच्या तीरावर केली जातात. त्याकामी अर्पण केलेल्या सर्व गोष्टी उदाहरणार्थ, फुले, पिंड, राख इत्यादी पाण्यातच टाकली जातात. परमेश्वराच्या नावावर पाण्याचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात होते हे आपण विसरतो.
शहरातील व गावांचे पाणी  वापर 
शहरांतून व गावांतून आता नळ योजनेतून पाणी मिळते. आदल्या दिवशी साठविलेले पाणी शिळे झाले म्हणून दुस-या दिवशी फेकून दिले जाते. खरे तर व्यवस्थित झाकून ठेवल्यास पाणी खराब होत नाही. नळावर येणारे पाणी धरणामध्ये अनेक दिवस साठवलेलेच असते ना? मोठी महापालिका क्षेत्रे वगळल्यास इतर शहरांतून आजही घरांच्या, सोसायट्यांच्या परिसरात मोकळी जागा उपलब्ध असते. ज्या नगरपालिका अथवा नगरपरिषदेच्या क्षेत्रांत भुयारी गटारे नाहीत, अशा ठिकाणी घर किंवा सोसायटीचे बांधकाम करतानाच ड्रेनेज पाईपची विशिष्ट तऱ्हेने रचना केली तर ते सांडपाणी केळी, माडासारख्या झाडांना किंवा बागेपर्यंत पोहोचू शकते. घराच्या छतावर पडणाऱ्या पावसाचे संकलन केले तर निदान काही घरे, सोसायट्या पाण्याच्या बाबतीत आत्मनिर्भर होऊ शकतील.
घरगुती पाणी बचत योजना 
आपण पाणी वापरामध्ये बचत करू शकतो. जसे बादलीत पाणी घेऊन आंघोळ केली तर १८ लिटर पाणी लागते. पण शॉवरखाली आंघोळ केली तर कमीत कमी १०० लिटर पाणी वापरले जाते. नळ सोडून दाढी केली तर १० लिटर; मगमध्ये पाणी घेऊन दाढी केली तर तेच काम एक लिटरमध्ये होते. नळ उघडा ठेवून दात ब्रश केले तर १० लिटरमध्ये; पण मगमध्ये पाणी घेऊन दात स्वच्छ केले की, एक लिटरमध्ये काम होऊ शकते. वाहत्या नळाखाली कापडे धुण्यासाठी ११६ लिटर पाणी लागते; तर बादलीचा वापर केला तर ३६ लिटरमध्ये तेच काम होऊ शकते. वॉशिंग मशीनमध्ये तर पाण्याचा बराच अपव्यय होतो. निदान कमीत कमी डिटर्जंटचा वापर करावा. मोटार धुण्यासाठी पाइपचा वापर केला तर १०० लिटर पाणी लागते; परंतु कपडा बादलीत भिजवून कार धुतली तर १८ लिटर पाण्यामध्ये काम होऊ शकते. वाहत्या नळाखाली हात धुतले तर १० लिटर पाणी वापरले जाते; परंतु मगमध्ये पाणी घेऊन हात धुतले तर अर्ध्या लिटरमध्ये काम होऊ शकते. शौचविधीनंतर फ्लशचा वापर केला तर २० लिटर पाणी जाते. परंतु बादलीत पाणी घेऊन त्याचा वापर केला तर सहा लिटरमध्ये काम होऊ शकते. कॉक दाबून पाणी सोडता येण्यासारखी सोय केली तर किंवा मोठा नळ बसवूनही ते काम होऊ शकते. आशा अनेक प्रकारच्या  उपाययोजना करू  शकतो . 


पाणी  वाचवा . जीवन वाचवा 




'पाणी-प्रत्येक थेंब महत्वाचा'

जागतिक तज्ज्ञांच्या मते भारताची लोकसंख्या २०२५ सालापर्यंत १५० कोटी होणार आहे. माणसाच्या दैनंदिन गरजेसाठी माणशी १५० लिटरपेक्षा अधिक पाणी वापरलं जातं. नागपूर, पुणे-मुंबईसारख्या शहरात तर हेच वापरायचं प्रमाण २०० प्रति लिटरपर्यंत जातं. पाण्याचा असाच वापर होत राहिला तर येत्या दहा-पंधरा वर्षात पाणी समस्या उग्र रूप धारण करील असं भाकीत केलं जात आहे

.पाण्याची बचत म्हणजेच पाण्याची निर्मिती
आपल्या देशात सर्वाधिक पाण्याचा वापर शेतीसाठी होतो. मात्र शेतीसाठी आता पारंपरिक पद्धती सोडून ठिबक किंवा तुषार सिंचन पद्धतीचा वापर केल्यास उपलब्ध पाण्यात चारपट पीक घेता येऊ शकतं, हे अनेक उदाहरणांवरून सिद्ध झालंय. मात्र अजूनही या नव्या पद्धतींचा स्वीकार शेतकर्‍यांनी म्हणावा तितका केला नाही.
.पाणी साठवा 
पावसाचे पडणारे पाणी, त्यातला थेंब न्‌ थेंब आपल्या ताब्यात घ्या. पडलेले पाणी खराब होणार नाही अशा पद्धतीने साठवून ठेवा आणि गरजेनुसार त्याचा वापर करा. या सर्व प्रक्रियेलाच म्हणायचे जलसंधारण किंवा रेन वॉटर हार्वेस्टिंग.मिळविलेले म्हणजेच साठविलेले पाणी वाचविणे, हासुद्धा पाण्याच्या नियोजनाचाच एक भाग आहे. पाण्याचा वापर आवश्‍यकतेनुसारच करायला हवा. साठविलेले पाणी वाया जाणार नाही, यासाठी सतत जागरूक राहायला हवे.
पाण्याचा उपयोग
पाणी साठविणे, ते वापरणे आणि वापरलेल्या पाण्याचा पुन्हा वापर करणे हा पाण्याच्या नियोजनाबाबतच्या दूरदृष्टीचा भाग म्हणायला हवा. इस्राईलमध्ये पाण्याचा एक थेंब किमान सहा वेळा वापरला जातो आणि मगच तो थेंब समुद्राला जाऊन मिळतो. पाण्याच्या बाबतीत अशी स्वयंशिस्त बाळगली, तर वाळवंटातील एक छोटेसे राष्ट्रसुद्धा जगात ताठ मानेने कसे उभे राहू शकते, हे लक्षात घ्यायला हवे.





प्रत्येक थेंब मिळवायचा कसा?
पावसाचा पडणारा प्रत्येक थेंब आपल्या ताब्यात आपण कसा ठेवू शकतो, या बाजूने विचार करणे आणि त्या अनुषंगाने प्रत्येकाने कृती करणे गरजेचे आहे. प्रथम आपले घर, मग आपण राहत असलेली इमारत, या इमारतींची मिळून बनलेली सोसायटी, असे आपण पाण्याचे नियोजन करू शकतो. उदाहरणादाखल असे समजा, पुण्यात सरासरी दर वर्षाला 60 सें.मी. पाऊस पडतो. आपल्या घराचे छप्पर साधारण 100 चौरस मीटर असेल, तर वर्षभर पडणारा पाऊस आपल्याला 60,000 लिटर पाणी देतो. हे पाणी आपण साठविले, तर त्याचा आपल्याला उपयोगच होईल. मग हे साठवायचे कसे? त्यासाठीच जलसंधारण करायचे. त्याच्या दोन पद्धती आहेत.

Thursday, 19 March 2015

                                                      
पाण्याचा पुनर्वापर


 

     सांडपाण्यावर प्रक्रिया करुण त्याविषयी योग्य ती  खबरदारी घेऊन ते पाणी  आपल्याला पुन्हा वापरात येते
    आशाप्रकारे पाण्याची जपणूक आणि त्याचे संवर्धन करण्याची वेळ आपल्यावर आली आहे. 

सांडपाण्याचा पुनर्वापर 
 सांडपाण्याचा  पुनर्वापर तुम्ही स्वतासाठीच  करणार असल तर ते अधिक खराब होणार नहीं ह्याची आपणच काळजी घेतली पाहिजे असे करण्यासाठी स्वयंशिस्त अंगी बाळगावी लागेल  . अन्य बाबतीत सुध्दा ह्या स्वयंशिस्तिचा फार फायदा होतो  . पर्यावरणाविषयी  आपली योग्य टी जाणीव अधिक दॄढ़  होते  . सांडपाणि  हे  झाडांसाठी ,वेलीसाठी  सध्या पाण्यापेक्षा  सरस  ठरते  .  सांडपाण्यात  काही पोषक द्रव्ये असतात  .  शेतीसाठी उपयोग झाला नहीं तर ही पोषण द्रव्ये वाया जातात  ही पोषण द्रव्ये मातीत मिसळतात आणि मातीला  सुपिक बनविण्यासाठी मद्त करतात  . आसा खात्रीचा पाणी पुरवठा झाल्यास शेती उत्पादनात वृद्धी होते  . नैसर्गिक जलचक्रास आपण हातभार लावत असताना अन्य व्यक्ति सुद्धा प्रेरणा लाभुन ते आपल्या सारखे  निसर्गप्रेमी बनु शकतात  . झाडे ,वेली ,व शेतमालाची वृद्धि होते असे  नहीं  तर त्या आधारे जगणाऱ्या निसर्गातील अन्य जीव ,जन्यु ,पशु ,पक्षी  ह्यांची सवर्धन होते   .
पाण्याच्या पुनर्वापराचे  फायदे 
सांपाणी पुनर्वापराचा एक दृश्य परिणाम म्हणजे घराला लागणाऱ्या शुद्ध पाण्याच्या गरजेत लक्षणीय रुपात व्यापक दृष्टी विचार केला तर असे म्हणता येते की सांडपाणि पुनर्वापराने शहराच्या पाणीपुरवठा क्षमता वाढवली जाते ह्याचा अर्थ असा की फक्त एकाच घरचा विचार करतात .
भूजल पातळीत  वाढ
जमिनीचा सर्वात  वरचा  थर जीव आणि प्रनिशास्त्री  दृष्टया सर्वाधिक क्रियाशील असतो  . ह्या थरातून पाणी खाली जाताना गाळले  जाते आणि अधिक शुद्ध पाणी  पुढे भूगर्भात साठे आणि  भूजलस्तर सुधरतो  . भूजल  पातळी  वाढल्याने हे पाणी  भूगर्भातूनच  खालच्या पातळीवर अंतस्थ  झऱ्यातून वाहत  जाते  .  आजूबाजूचा परिसर समृद्ध होतो  . तेथील भूजलस्तर पण  सुधरतो  .  सांडपाणि वगैरे  विषय  पण हयातुन जेव्हा आर्थकारण संभवतो  तेव्हा तो विषय अस्पृश्य  ठरत नहीं  . प्रतेक घरचा आणि नगर पालिकेचा आर्थिक ताळमेंळ कमळीचा सुधरतो  .

पाण्याचे प्रदूषण 

कारणे , नियंत्रण व  शुद्धिकरण 


दिवसेंदिवस कमी होत जाणारी पाण्याची प्रतिमाणशि  उपलब्धता , अनियमित पाऊस , अपूरे नियोजन व नियंत्रण या अशा अनेक कारणंमुळे पाणीप्रश्न गंभीर होत चालला आहे  . आशावेळेस आहे ते पाणी जपून वापरवेत  हा मार्ग सर्वांनी अंगीकरणे जरूरी आहे  . पण कधीकधी अशी परस्थि उद्भवते की जपून सोडाच  आहे ते पाणी जगण्यासाठी वापरणे देखील दुष्कर होते  .  नदीचा प्रवाह या गलीछाच्या  खाली अंधारात वाहतो आहे   . वाहत्या पाण्यात जेव्हा अशी वनस्पति वाढते तेव्हा त्याच्या अर्थ  ते पाणी  दूषित आहे असा होतो  . लोणावळा  शहरचे सांडपाणी नाल्याच्या माध्यमांच्या इन्द्रेणी नदीला मिळते   . या पाण्यातिल प्रदूषकांमुळे नदीचे  पाणि खुपच खराब होते त्यातील जैविक प्रदूषकांमुळे हिरव्या वनस्पति अमर्यादा वाढ नदीपात्रत होते  .  ही प्रदूषके पाण्यातही  शिल्लक असतातच  आणि हेच पाणी  खालच्या बाजूच्या खेड्यांना व शहरांना पिण्यासाठी ,शेतीसाठी आणि अन्य सर्व कामांसाठी वापरवे लागते   . त्यात आपली श्रद्धास्थाने देउळे ही देखील अली   . ही गावे तसेच शहरे तितकिशि मोठा आणि आर्थिकदृष्ट्या सबल नाहीत   . त्यामुळे  त्यांना  या पाण्या चे  पुरेसे शुद्धिकरण करता येत नहीं  पिण्याच्या पाण्याकरिता भारत सरकारने निश्चित केलेले पाण्याचे गुणवत्ता मानक आहे  .

पाण्याचे प्रदूषण


पाण्याचे प्रदूषण म्हणजे काय ? पाणी  म्हणजे शुद्ध H२O त्यात अन्य कोणतेही घटक नाहीत. आभाळतुन
जेव्हा पाऊस तेव्हा तो शुद्ध H2O असतो परंतु त्याच्या हवेत ल्या  आणि जमिनीवरच्या प्रवासात त्याच्या वेगवेगळ्या प्रदूषकचा  भर पड़त जातो  . हवेमधील प्रदूषके म्हणजे तरंगते पदार्थ ,विद्र्व्या पदार्थ ,वेगवेगळे रसायनांची वाफ आणि वायु जेव्हा हे पदार्थ पाण्याच्या संपर्कात येतात तेव्हा त्यातील कही पदार्थ पाण्यावर  तरंगतात  उदा. धुलीकरण हे पाण्याच्या प्रवाहत वाहत जातात ; पण पाण्याचा वेग कमी होताच ख़ालिबसतात काही रसायने, वायु पाण्याच्या मुळ रूपामधे म्हणजे H2O मधे भर पड़ते   . जोपर्यंत यांचे प्रमाण वाढल्यावर ते हानिकारक ठरू न  वेगवेगळे रोग विकृती  निर्माण करतात किवा काही वेळेस जीविताला धोकादायक ठरू शकतात. 

जलचक्रचा  वापर 
पाऊस - पाणी -जलचक्रशुद्धिकरण केंद्र -निर्माण झालेले सांडपाणि - ग्राहक - मलप्रक्रिया केंद्र - समुद्र बाष्पीभवन -पाऊस पाण्याच्या वापरच्या वरील चक्रतील सांडपाण्याच्या प्रक्रिया करुण त्याला वापरायोग्य बनविणे आणि चक्रामधून ग्रहकाकडे पुन्हा वळविणे याला पुनर्चक्रीय म्हणतात   . यात घन पदार्थ काढून टाकणे ,हवा खेळविणे ,जैविक प्रक्रिया ,गाळ  खाली बसविणे अशा क्रियांचा समावेश होतो   . पण हे सर्वत्र शक्य होईल असे नाही. कारण  या शुद्धिकरण यंत्रणा उभारण्याचा खर्च प्रक्रिया इमारतीला  परवडले असे  नाही   . म्हणून आजमितिस कारखान्यांना त्यांना सांडपाणि जलप्रवाहात  सोडण्यापूर्वी त्यावर प्रक्रिया करने  सक्तिचे  आहे व हळूहळू निवाशी संकुलन  देखील ही योजना सरकारी  माध्यमातून सक्तिची  होईल  . या पाण्या तिल  विविध  प्रकारची अशुद्धि व त्याचे  निर्मूलन याचा  आपन  विस्तार पूर्वक  अभ्यास करू  . 

Saturday, 7 March 2015

पाणी वाचवा ! 
पृथ्वी वरील पाण्याचे विभाजन 
पृथ्वी २/३ भाग पाण्याने व्यापला आहे .  त्यापैकी  ९७% पेक्षा जास्त पाणी समुद्रात आहे . म्हणजे खारे आहे . त्यामुळे ते मानवाला तसे वापरा साठी उपयोगी नाही . नदी ,तलाव या गोडया पाण्याच्या साठयापैकी २३% पाणी दोन्ही धृवार  बर्फाच्या रुपात आहे म्हणजे तेही तसे वापरण्यास योग्य नाही . पृथ्वी वरील पाण्याची पाण्याची सूर्याच्या उष्णतेने वाफ होते . या वाफेचे धुलीकानांशी संपर्क येऊन  धग बनतात . हे ढग वाऱ्याबरोबर वाहत जातात डोंग्राद्वारे  अडून किवा तापमानातील फरकामुळे  पाण्याचे थेंब द्रव  स्वरुपात आल्याने पाऊस  पडतो . पाउसचे पाणी जमिनीवरून वाहते त्यापैकी काही जमिनीत मुरते तर काही  जमिनिवरून वाहत खाचखळग्यात  साचते अथवा ओढे ,नाले ,नद्या  यांच्या माधमातून वाहत शेवटी समुद्राला  जाऊन  मिळते .





पाण्याच्या जुन्या स्त्रोतांचे प्रदूषण
शहरातले तसेच गावतले जुने पाण्याचे स्रोत  म्हणजे विहिरी ,तलाव, कालवे ,सरोवरे , झिरे , यांचे आजचे स्वरूप एकदा पडताळून पाहण्याची गरज आहे . धरणा  पासून ,नळा मार्फत   पाणीपुरवठा  योजना  राब्विल्यंतर  त्या  पहिल्यांदा निर्माल्य  आणि नंतर चक्क कचरा टाकला जातो . हे सर्व जालस्रोतता अत्यंत प्रदूषित व  निरुपयोगी  होतात . वस्तू: हे जुने जलस्रोत भूजलाचे निर्देशक आहेत . त्याचे रक्षण आणि जतन झाले  तर त्यांच्याबरोबर तेथील जलचरांचे आणि पर्यावरणाचे रक्षण व जतन होते .  शिवाय पाणी टंचाईच्या  संकटात हे स्त्रोत गावाचे व शहरचे रक्षण करतात . या जाल्स्रोतांना मानव निर्मित प्रदूषनापासून  वाचवायची गरज  आहे .

परंपरेतून  निसर्गाचे जतन

आपल्याकडे  विविध  वृक्षांची वेगवेगळी वेळ पूजा करायला सांगितली  आहे आणि तिहि त्या वृक्षाच्या समित जाऊन उदा. वड, पिंपळ, औदुंबर इ.
वस्तुता  झाडे  हावेतिल  कार्बनडायऑक्साइड  शोषूण  घेतात आणि  ऑक्सिजन  हवेत सोडतात . त्यामुळे हवा शुद्ध आरोग्यदायी होते. पण पूजा करण्यासाठी या झाडांच्या फांद्या तोडून आपण मूळ  कल्पनेवरच प्रहार करतो झाडांना वेगवेगळ्या उंचीवर फांद्या असतात आणि त्यांच्या पानाची छत्री असते पावसाचे थेंब या पानावर ,फांद्यांवर पडून अडतात आणि सावकाश जमिनीवर पडतात . जमिनीवर पडलेल्या जुन्या फांद्या डहाळ्या यांच्यामुळे पावसाच्या वाहत्या पाण्याला प्रवाहाला अडथळे निर्माण होतात आणि त्याच्या वाहण्याचा वेग कमी होतो पर्यायाने मातीची धूप कमी होते शिवाय सुकलेल्या सच्छिद्र पानाचा जमीवर एक थर तयार होतो ह्युमस . हा स्प्न्जासारखा पाणी शोसून घेतो . हे सगळ पाणी जमिनीत मुरत, मुरलेल्या पाण्याचा काही हिस्सा जमिनी खाली वाहत कोठेतरी बाहेर पडतो  त्यालाच आपण झरे म्हणतो . म्हणजे झाडांचे छ्त्र  पाण्याचे जतन करते . पण सरपणासाठी कोळ्शासाठी आणी चक्क वृक्ष पूजेसाठी देखील झाडे तोडून आपण या छत्रावर घाला घालून पाणी तोडत आहोत ज्या डोंगरावरील झाडे तोडली गेली आहे अशा डोंगराखाली गावांचे पाणी दुर्भिक्ष लगेच जाऊन लागते या पाण्याला म्हणजे झाडांच्या छत्राला वाचवायची नितांत गरज आहे. तरच गावे आणी गावातील माणसे वाचतील.