Saturday, 7 March 2015

पाणी वाचवा ! 
पृथ्वी वरील पाण्याचे विभाजन 
पृथ्वी २/३ भाग पाण्याने व्यापला आहे .  त्यापैकी  ९७% पेक्षा जास्त पाणी समुद्रात आहे . म्हणजे खारे आहे . त्यामुळे ते मानवाला तसे वापरा साठी उपयोगी नाही . नदी ,तलाव या गोडया पाण्याच्या साठयापैकी २३% पाणी दोन्ही धृवार  बर्फाच्या रुपात आहे म्हणजे तेही तसे वापरण्यास योग्य नाही . पृथ्वी वरील पाण्याची पाण्याची सूर्याच्या उष्णतेने वाफ होते . या वाफेचे धुलीकानांशी संपर्क येऊन  धग बनतात . हे ढग वाऱ्याबरोबर वाहत जातात डोंग्राद्वारे  अडून किवा तापमानातील फरकामुळे  पाण्याचे थेंब द्रव  स्वरुपात आल्याने पाऊस  पडतो . पाउसचे पाणी जमिनीवरून वाहते त्यापैकी काही जमिनीत मुरते तर काही  जमिनिवरून वाहत खाचखळग्यात  साचते अथवा ओढे ,नाले ,नद्या  यांच्या माधमातून वाहत शेवटी समुद्राला  जाऊन  मिळते .





पाण्याच्या जुन्या स्त्रोतांचे प्रदूषण
शहरातले तसेच गावतले जुने पाण्याचे स्रोत  म्हणजे विहिरी ,तलाव, कालवे ,सरोवरे , झिरे , यांचे आजचे स्वरूप एकदा पडताळून पाहण्याची गरज आहे . धरणा  पासून ,नळा मार्फत   पाणीपुरवठा  योजना  राब्विल्यंतर  त्या  पहिल्यांदा निर्माल्य  आणि नंतर चक्क कचरा टाकला जातो . हे सर्व जालस्रोतता अत्यंत प्रदूषित व  निरुपयोगी  होतात . वस्तू: हे जुने जलस्रोत भूजलाचे निर्देशक आहेत . त्याचे रक्षण आणि जतन झाले  तर त्यांच्याबरोबर तेथील जलचरांचे आणि पर्यावरणाचे रक्षण व जतन होते .  शिवाय पाणी टंचाईच्या  संकटात हे स्त्रोत गावाचे व शहरचे रक्षण करतात . या जाल्स्रोतांना मानव निर्मित प्रदूषनापासून  वाचवायची गरज  आहे .

परंपरेतून  निसर्गाचे जतन

आपल्याकडे  विविध  वृक्षांची वेगवेगळी वेळ पूजा करायला सांगितली  आहे आणि तिहि त्या वृक्षाच्या समित जाऊन उदा. वड, पिंपळ, औदुंबर इ.
वस्तुता  झाडे  हावेतिल  कार्बनडायऑक्साइड  शोषूण  घेतात आणि  ऑक्सिजन  हवेत सोडतात . त्यामुळे हवा शुद्ध आरोग्यदायी होते. पण पूजा करण्यासाठी या झाडांच्या फांद्या तोडून आपण मूळ  कल्पनेवरच प्रहार करतो झाडांना वेगवेगळ्या उंचीवर फांद्या असतात आणि त्यांच्या पानाची छत्री असते पावसाचे थेंब या पानावर ,फांद्यांवर पडून अडतात आणि सावकाश जमिनीवर पडतात . जमिनीवर पडलेल्या जुन्या फांद्या डहाळ्या यांच्यामुळे पावसाच्या वाहत्या पाण्याला प्रवाहाला अडथळे निर्माण होतात आणि त्याच्या वाहण्याचा वेग कमी होतो पर्यायाने मातीची धूप कमी होते शिवाय सुकलेल्या सच्छिद्र पानाचा जमीवर एक थर तयार होतो ह्युमस . हा स्प्न्जासारखा पाणी शोसून घेतो . हे सगळ पाणी जमिनीत मुरत, मुरलेल्या पाण्याचा काही हिस्सा जमिनी खाली वाहत कोठेतरी बाहेर पडतो  त्यालाच आपण झरे म्हणतो . म्हणजे झाडांचे छ्त्र  पाण्याचे जतन करते . पण सरपणासाठी कोळ्शासाठी आणी चक्क वृक्ष पूजेसाठी देखील झाडे तोडून आपण या छत्रावर घाला घालून पाणी तोडत आहोत ज्या डोंगरावरील झाडे तोडली गेली आहे अशा डोंगराखाली गावांचे पाणी दुर्भिक्ष लगेच जाऊन लागते या पाण्याला म्हणजे झाडांच्या छत्राला वाचवायची नितांत गरज आहे. तरच गावे आणी गावातील माणसे वाचतील.

No comments:

Post a Comment